औरंगाबाद हादरलं ! ४८ तासात पाच जणांनी संपविले जीवन, घटनेने जिल्ह्यात खळबळ

राज्यात सर्वत्र आनंदात दिवाळी साजरी केली जात आहे. या दिवाळीदरम्यानच औरंगाबादमधून धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. औरंगाबादमध्ये गेल्या ४८ तासांमध्ये पाच जणांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. यातील चौघे तर अवघ्या १७ ते २१ वयोगटातील तरुण-तरुणी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादेत आत्महत्येच्या पाच घटना घडल्या आहेत. पहिल्या घटनेत नर्सिंगचे शिक्षण घेणारी कोमल रामसिंग जाधव (१९) ही कुटुंबातील मुकुंदवाडीतील मुकुंदनगरात राहत होती. महिनाभरापूर्वी तिच्या आईचे निधन झाल्याने कोमल खचली होती. तेव्हापासून ती घरात शांत राहत होती. तिने घरातील खोलीत गळफास घेतला.

दुसऱ्या घटनेत विशालनगरातील दिलीप विनायक घोडके (४६) यांनी स्वयंपाकघरात गळफास घेतला. तर बीड बायपास येथे राहणाऱ्या शेख आवेज शेख इमाम (२१) या तरुणाने एमआयटीसमोरील अथर्व बिल्डर्सच्या साइटवर जाऊन गळफास घेत आत्महत्या केली.

चौथ्या घटनेत सिद्धार्थनगरातील प्रांजल संजय गायकवाड (१७) हिने देखील गळफास घेत आयुष्य संपवले. तर पाचव्या घटनेत धूत रुग्णालयासमोरील मूर्तिजापूर येथील महाविद्यालयीन शिक्षण घेणारा विद्यार्थी रोहित भागवत शिंदे (२०) याने गळफास घेतला.

दरम्यान, शहरात इतक्या मोठ्या प्रमाणावर आत्महत्या होत असल्याने जीवन अप्रिय आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच यातील चार जण हे १७ ते २१ वयोगटातील असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *