विठ्ठलाच्या आषाढी वारीसाठी लाखो भाविक पंढरी नगरीमध्ये दाखल होत आहेत. आज विठ्ठलाच्या दर्शनासाठी दर्शन रांगेत उभे असणाऱ्या भाविकांना, वारकऱ्यांना आठ तास लागत आहेत.
आषाढी एकादशी 29 जूनला आहे. काही दिवसांवर आषाढी एकादशी येऊन ठेपलेली आहे, तरी लाखो भाविक पंढरी नगरीमध्ये दाखल होत आहेत. आज विठ्ठलाच्या दर्शनासाठी आठ तासाचा अवधी लागत आहे. हजारो भाविक, वारकरी दर्शन रांगेमध्ये उभे आहेत, विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर वर्षभराचा शिनवटा जातो, आणि मनाला समाधान लाभते अशा बोलक्या प्रतिक्रिया दर्शनबारीतून वारकरी आणि भाविकांनी दिली आहे.