स्मार्ट सिटीच्या झालेल्या ढिसाळ कामामुळे सोलापूरकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे- महेश धाराशिवकर

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने महानगरपालिका प्रवेशद्वारात गजराचा केक कापत गांधींगिरी पद्धतीने स्मार्ट सिटी चा वाढदिवस साजरा करण्यात आला. काल झालेल्या मान्सूनच्या पहिल्या पावसातच सोलापूर शहरात ठीक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. स्मार्ट सिटी ची चांगल्या पद्धतीने काम झाले असते तर सोलापूरकरांवर ही वेळ आली नसती. स्मार्ट सिटीच्या झालेल्या ढिसाळ कामामुळे सोलापूरकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याला सर्वस्वी स्मार्ट सिटी चे सीईओ त्र्यंबक डेंगळे पाटील जबाबदार असल्याचा आरोप करत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने महानगरपालिका प्रवेशद्वारावर गाजरांचा केक कापत स्मार्ट सिटी चा वाढदिवस साजरा करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *