तृतीयपंथी म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या जोगाम्मा या राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार घेण्यास गेल्या तेव्हा त्यांनी केलेली कृती…

हे फार भन्नाट आहे…. आधी व्हिडीओ बघा आणि मग वाचा…

पद्म पुरस्कार म्हटलं की तिथेच अर्ध्या गोष्टी संपतात… एखाद्या गोष्टीसाठी आयुष्य खर्ची करणाऱ्या व्यक्तीच्या नावाआधीच पद्म असणारा पुरस्काराचं प्रीफिक्स लागतं… इथे मुद्दा तो नाहीय… तर मुद्दा आहे पुरस्कार स्वीकारण्याआधी त्यांनी जे केलं त्याचा… आपण बदलतोय याचा… आपण त्यांना स्वीकारतोय याचा…

राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार स्वीकारणे हा कोणत्याही भारतीयासाठी अभिनानाचा आणि आयुष्यभर लक्षात राहणारा क्षणच असतो, मग ते भारतीय अगदी त्यांच्या क्षेत्रातील दिग्गज असले तरी ते भारावून जातात. सामान्यपणे राष्ट्रपतींशी हस्तांदोलन करुन पुरस्कार स्वीकारला जातो. मात्र तृतीयपंशी म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या जोगाम्मा या राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार घेण्यास गेल्या तेव्हा त्यांनी केलेली कृती पाहून त्या सभागृहामध्ये असणाऱ्या पंतप्रधानांपासून ते सभागृहातील इतर मान्यवरांनीही टाळ्या वाजवून त्यांच्या कृतीचं कौतुक केलं.

जोगाम्मा या तृतीयपंथी आहेत. आता तृतीयपंथी म्हटल्यावर ते आपल्याकडे जेवढ्या वाकड्या नजरेने पाहत नाही तेवढे पूर्वग्रह दुषीत ठेऊन त्यांच्याकडे पाहणाऱ्यांमध्ये आपण सर्वसामान्य आहोत. म्हणजे तुम्हीच नाही मी सुद्धा तुमच्यातलाच आहे त्यांच्याकडे ते आपल्यातले नाही या नजरेने पाहणारा. पण इथे जोगाम्मा यांनी तुमच्या माझ्यासारख्या थिल्लर लोकांची पर्वा न करता स्वतःचं आपलेपण या सर्वोच्च मंचावरही जपलं… त्या राष्ट्रतींसमोर पुरस्कार घ्यायला गेल्या. राष्ट्रपती पुरस्कार देणार इतक्यात त्यांनी साडीचा पदर एका हातात धरुन तो गोलगोल फिरवला नंतर राष्ट्रपतींपासून काही अंतरावरुन हात वर खाली फिरवून त्यांच्या पायाशी असणाऱ्या पायरीवर बोटं मोडून त्यांनी नजर काढली…

आता हे नजर काढणं वगैरे इललॉजिकल वाटू शकतं पण तृतीयपंथी ज्यासाठी ओळखले जातात ते त्यांनी केलं. याकडे वैज्ञानिक दृष्टीकोनातून न पाहता प्रेम या भावाने पहावं. देशातील सर्वात मोठ्या पदावर असणारी म्हणजे पंतप्रधानांच्याही वर असणारी व्यक्ती समोर असताना न घाबरता, संकोच मनात न ठेवता आपल्या आपल्या स्टाइलने आणि सगळ्यात युनिक पद्धतीने त्यांनी प्रेम व्यक्त केलं… हे रिपिट मोडवर पाहिलं ना यात फार फार सारे रिड बिटवीन द लाइन्स आहेत आणि तेच पाहताना आणि याचा आक्षय लक्षात घेतल्यास उगा डोळे पाणावल्यासारखे होतातय…

खरं तर आपण फार खुजे आहोत या जोगाम्मांसमोर… आपल्याला आपलं असणं स्वीकारता येत नाही तर एवढ्या मोठ्या स्टेजवर व्यक्तं होणं लांबचं राहिलं…. असं निस्वार्थी आणि भरभरून दिलेलं प्रेम पाहून राष्ट्रपतीही भावूक झाले असतील यात शंका नाही….

पद्म पुरस्कार सोहळ्यांच्या इतिसाहात कायम लक्षात राहिल असा हा क्षण वाटतोय मला तरी….

शेवटी मॉरल ऑफ द स्टोरी काय तर

तुम्ही कोणीही असला आणि तुमच्या क्षेत्रात आणि त्याहून मुख्य म्हणजे स्वत:शी प्रमाणिक राहिलात तर हे असं स्वछंदी जगता येतं आणि त्या स्वच्छंदीपणाचा आनंद वाटता येतो… जसा या जोगाम्मा यांनी वाटलाय….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *