भारतीय लष्कराच्या गाडीला भीषण अपघात, 16 जवान शहीद

सिक्कीममध्ये भारतीय लष्कराच्या ट्रकला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 16 भारतीय जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सध्या घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. नॉर्थ सिक्कीममध्ये झालेल्या एका रस्ते अपघातात भारतीय लष्कराच्या जवानांच्या जीवितहानीमुळे खूप दुःख झाले आहे.

जवानांच्या सेवेबद्दल आणि वचनबद्धतेबद्दल देश मनापासून कृतज्ञ आहे. शोकग्रस्त कुटुंबियांना माझ्या संवेदना. जखमी जवान लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो, असं संरक्षण मंत्र्यांनी म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *