कांद्याचा ट्रक देशाबाहेर घेऊन जाऊ; कांदाप्रश्‍नी राज्य, केंद्र सरकारला आमदार बच्चू कडूंचा इशारा

डोळ्यात पाणी आलं तरी चालेल; पण रक्त अटता काम नये. त्यामुळे लवकरात लवकर कांदा निर्यात बंदी हटवावी. बंदी उठली नाही तर कांद्याचा ट्रक देशाबाहेर घेऊन जाऊ; असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. आमदार बच्चू कडू हे कालपासून उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर आहेत. वेळ आली तर आम्ही कुठलाही मार्ग स्वीकारू असा इशारा देत येत्या पंधरा दिवसांमध्ये दिल्ली चलो आंदोलन करणार असून कांद्याचा ट्रक घेऊन देशाबाहेर घेऊन जाता येईल का? हे देखील पाहणार आहोत; असे आमदार कडू म्हणाले.शिंदे सरकारने आश्‍वासन पूर्ण करावे

तत्पूर्वीच राज्य आणि केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करावा. शिंदे सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार म्हणून ओळख व्हावी. त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा असून त्यांनी राज्यातील एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होऊ देणार नाही, असे आश्वासन दिलं आहे ते पूर्ण करावे. तसेच अमरावती येथे पोलिसांनी शेतकऱ्यांवर केलेल्या लाठीचार्जचा निषेध केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *