पुढील दोन दिवसात मोबदला न मिळाल्यास आत्मदहन करणार
मौजा धारवाडा, कौंडण्यपूर व छिंदवाडी येथील शेतक-यांची जमीन निम्न वर्धा धरणातील पाण्यात पुन्हा डूबली असून अंतीम मुल्यांकन निवाडा सुद्धा झाला आहे. परंतू निधी उपलब्ध नसल्याचे कारण सांगुन धनादेश वाटप रोखला आहे. यासंदर्भात कार्यकारी अभियंता निम्न वर्धा दि. १० एप्रिल पर्यंत वाटप न केल्यामुळे ११ एप्रिल पासून धारवाडा पुनर्वसन बसस्टॉप येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. पुढील दोन दिवसात मागण्या मान्य न झाल्यास जेथे जागा मिळेल तेथे आत्मदहण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी उपोषण मंडपातून दिला आहे.