आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी येत असल्याने चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता कमिटीचे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शांतता कमिटीत महाराष्ट्र राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराती तहसीलदार गौरी धायगुडे, पशुवैद्यकीय अधिकारी ,नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक, यांच्यासह राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक केके पाटील यांनी मुस्लिम बांधवांना जिल्ह्यातील कुर्बानी न करण्याचे घोषित केले आहे. त्याप्रमाणे चोपडा शहरातील मुस्लिम बांधवांनी त्या दिवशी कुर्बानी न करता दुसऱ्या दिवशी द्यावी असे आवाहन यावेळी केले. या शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये इतर सदस्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. त्या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराती यांनी त्यांच्याशी संवाद साधू अत्यंत चांगला तोडगा निघाला पाहिजे अशा सूचना यावेळी दिल्या आहेत.
Written by Nagesh Wadekar
Other posts by author
- सुदृढ आरोग्यासाठी क्रीडा-कौशल्यपूरक जीवनशैलीचा अंगीकार करा – आ. सौ. सुलभाताई खोडके
- विद्युत पुरवठ्या संदर्भातील देखभाल व दुरुस्तीची कामे मान्सूनपूर्व तातडीने पूर्ण करा – आमदार सुलभाताई खोडके
- यवतमाळ : निवडणुकीचे काउंटडाऊन सुरू, भाऊ की ताई तर कार्यकर्त्याची लगीन घाई
- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा केंद्रबिंदू मानव आणि मानवच होता – आमदार सौ.सुलभाताई खोडके
- सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे आरोग्य सुविधेसाठी १३० कोटींचा निधी मंजूर