आषाढी यात्रेच्या निमित्ताने उजनी धरणातून भीमानदी पात्रात सोडण्यात आलेले पाणी रात्री चंद्रभागा नदीत पोचले. नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. अनेक दिवसा नंतर चंद्रभागा दुथडी भरून वाहू लागल्याने भाविकांची स्नानासाठी एकच झुंबड उडाली आहे. नदीत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्याने चंद्रभागा स्वच्छ आणि निर्मळ वाहू लागली आहे.
आषाढीसाठी उजनी धरणातून भीमानदीत पाणी सोड्याचे आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले होते. त्यानंतर 21 जून पासून सुमारे 3 हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. यंदा पाऊस उशीराने आल्यामुळे धरणातील पाणीसाठा मृत पातळीत गेला आहे. आषाढीसाठी चंद्रभागेत पाणी सोडल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.