एका आठवड्यात सरळ भरती सेवा शुल्क कमी करा, अन्यथा वंचित युथ रस्त्यावर उतरेल – प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला सात दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. तर आगामी लोकसभा निवडणुकीकरीता निधी जमवण्यासाठी खासगी कंपन्यांचा वापर सरकार करत आहे. तर सरळ सेवा भरती मार्फत सुशिक्षित बेरोजगारांकडून शुल्क वसुली थांबवावी. अन्यथा वंचित बहुजन युथ आघाडी रस्त्यावर उतरेल, असा इशारा देत सरकारला सात दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे.

कायदा मानायचाच नाही असे राज्यमध्ये येते. त्यावेळी आपलं कोण वाकड करणार नाही, असे त्यांना माहीत असते. जसेजसे भीतीचे वातावरण निवडणुकीपूर्वी निर्माण करण्यात येणार आहे. तर आज ज्यावेळी पत्रकाराला मारहाण केली, तर त्यावर कारवाई होत नाही म्हणजे सरकार भीतीचे वातावरण तयार करत आहे. त्यामुळे आपलं कोण वाकडं करणार, त्यामुळे लोकांना येणाऱ्या निवडणुकीच्या वेळी निर्णय घ्यावा लागेल, असेही आंबेडकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *