राज्यात 15 दिवस कडकडीत लॉकडाऊन करावा, उच्च न्यायायलयाच्या राज्याला सूचना

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या तसेच नागरिकांचे कोरोवीषयक गांभीर्य लक्षात घेता, मुंबई उच्च न्यायालयाने मोठे वक्तव्य केले आहे. राज्य सरकारने 15 दिवस कडकडीत लॉकडाऊन लागू करण्याचा विचार करावा, अशी सूचना हायकोर्टाने केली आहे. तसेच कोरोविषयी लोकं अजूनही गंभीर दिसत नाहीयेत. कोरोनाविषयक नियमांचं पालन केलं जात नाहीये. असे असेल तर कोरोनाला कसं रोखलं जाणार आसा सवालसुद्धा हायकोर्टाने केलाय.

मुंबई उच्च न्यायालय काय म्हणाले ?

राज्यातील कोरोना आणि लॉकाडाऊनच्या अनुषंगाने राज्य सरकारने एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. राज्यातली परिस्थिती पाहिली तर अजूनही लोक बाहेर दिसत आहेत. लोक अजूनही गंभीर नाहीत. त्यामुळे राज्यात पूर्ण 15 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन केल्याशिवाय परिस्थिती आटोक्यात येणार नाही. राज्य सरकारने पूर्ण 15 दिवसांचा कडकडील लॉकडाऊन लागू करावा, अशी सूचाना न्यायालयाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *