आजीच्या दशक्रियाच्या कार्यक्रमासाठी कुटुंबासोबत नदीवर गेलेल्या 2 सख्या नातवांचा नदीवर आंघोळ करतेवेळी बुडून मृत्यू

अमरावती: आपल्या आजीच्या दशक्रियाच्या कार्यक्रमासाठी कुटुंबासोबत नदीवर गेलेल्या 2 सख्या नातवांचा नदीवर आंघोळ करतेवेळी बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खानापूर गवळी या गावामध्ये घडली.

मनीष टोपमे व ईश्वर टोपमे असे नदीत बुडून मृत्यू झालेल्या दोन तरुणांचे नाव आहे. या दोन्ही तरुणांचीच्या आजीचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर आज दशक्रिया चा कार्यक्रम गावातील एका नदीकाठीच्या मंदिर परिसरात आयोजित करण्यात आला होता.

यावेळी नातू मनीष व ईश्वर टोम्पे हे दोघेही नदीत आंघोळीला गेले. दरम्यान नदीला जास्त पाणी असल्याने हे दोघे भाऊ नदीतील भोवऱ्यात अडकून यांचा मृत्यू झाला. यावेळी नातेवाईकांनी नदीत उतरून या दोघांनाही जीव वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न केला. परंतु दुर्दैवाने या दोघांचेही निधन झाले होते. एकीकडे आईचा दसवा आई गेल्याचं कुटुंबावर दुःख त्यांनाच दोन मुलेही नदीत बुडून मृत्युमुखी पडल्याने टोम्पे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *