नाशिक : कोरोना लाट ओसरल्यामुळे आणि मागील दोन वर्षांपासून लादलेले कोरोना निर्बंध हटविल्यामुळे, सध्या लग्न सराईचा उत्साह जोरदार सुरु आहे. लग्न म्हंटलं की लग्नाला जाणारं वऱ्डाड हा एक महत्वाचा भाग असतो. कारण, वऱ्हाडाशिवाय लग्नकार्य अपुर्ण असल्यासारख वाटतं.
अनेकदा वऱ्हाडाला ट्रकमधून, तसंच गावाकडे ट्रॅक्टरमधून वऱ्हाड घेऊन जातात. तर कधी गाडीतून देखील वऱ्हाड घेऊन जातात. अनेक वेळा लग्नाला जाणाऱ्या वऱ्हाडाचा अपघात देखील होतो. असाच एक अपघात नाशिकच्या सिन्नरजवळ टेंभुरवाडी येथे लग्नाला जाणाऱ्या वऱ्हाडाच वाहन पलटल्याने अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.
ही संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. टेंभुरवाडीकडे जात असताना टर्न घेताना या वऱ्हाडाच्या वाहनाचा चालकाकडून ताबा सुटल्याने हे वाहन पलटी झाले आणि यावेळी मागच्या बाजूला बसलेले वऱ्हाड रस्त्याच्या कडेला जाऊन पडले, यात म्हातारे व्यक्ती, महिला आणि लहान मूल देखील होते, सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नसून या घटनेत वऱ्हाडातील काही जण हे जखमी झाले आहेत.
दरम्यान, या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही वाहनचालकाने एवढ्या लोकांना घेऊन जात असताना आपल्या वाहनाचा वेग मर्यादीत ठेवायला हवा. शिवाय जबाबदारीने वाहन चालवायलं हवं. अन्यथा शुभकार्याला जातानाच अपघात होऊ शकतात हेच या व्हिडीओतून दिसून येत आहे.
https://www.facebook.com/batmipatra.in/videos/553336073035624