अमरावतीत नुकतीच जिल्हा मध्यवर्ती बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. ही वार्षिक सभा वादग्रस्त होण्याची शक्यता होती. मात्र, बँकेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत शांततेत ही सभा पार पडली. यावेळी माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी म्हंटले की, कोणी विनाकारण जर आडवं येत असेल तर आम्ही आहोच. जर पाणी पाजून कोणी म्हणत असेल की विष पाजता तर विष काय असते ते त्यांना पाजाव लागेल. कोरडवाहू शेतकऱ्यांना कुंपण योजना आणि थकीत कर्जदारांना 50 टक्के सरकारने भरावा आणि 50 टक्के शेतकऱ्यांनी भरावा आणि तेही टप्प्या टप्प्याने. हे संपूर्ण राज्यात झालं पाहीजे यासाठी मी मुख्यमंत्री यांना भेटणार आहे. आम्ही सगळ्यांना बोलू दिलं आणि त्याची अंमलबजावणी केली जाईल. आधी छोट्याश्या हॉल मध्ये सभा व्हायची आता आमसभा मोठ्या हॉल मध्ये होत आहे आणि पुढेही असच होणार. ही बँक शेतकऱ्यांची आत्मा आहे.
Written by Nagesh Wadekar
Other posts by author
- सुदृढ आरोग्यासाठी क्रीडा-कौशल्यपूरक जीवनशैलीचा अंगीकार करा – आ. सौ. सुलभाताई खोडके
- विद्युत पुरवठ्या संदर्भातील देखभाल व दुरुस्तीची कामे मान्सूनपूर्व तातडीने पूर्ण करा – आमदार सुलभाताई खोडके
- यवतमाळ : निवडणुकीचे काउंटडाऊन सुरू, भाऊ की ताई तर कार्यकर्त्याची लगीन घाई
- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा केंद्रबिंदू मानव आणि मानवच होता – आमदार सौ.सुलभाताई खोडके
- सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे आरोग्य सुविधेसाठी १३० कोटींचा निधी मंजूर