देशात होत असलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली असून सभा आणि रॅलींचा धडाका सुरू आहे.
भाजपकडून राममंदिर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन जोरदार प्रचार सुरू आहे. अशातच भाजपच्या निवडणुक प्रचारावर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केले असून याप्रकरणी ठाकरे गटाने निवडणुक आयोगाला पत्रही पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.