मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिल्या जाणार पुरस्कार
अमरावती । सामाजिक कार्यात सहभाग असणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र शासनाच्यावतीनं महत्वाचा समाजभूषण पुरस्कार दिल्या जातो. त्याच प्रमाणे अमरावतीमधील गुरु रविदास पतसंस्था व न्यू रविदास गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष वासुदेवराव वानखडे यांना सन २०२०-२१ चा समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. सदर पुरस्कार हा मुंबई येथे दिनांक १२ मार्च रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दिल्या जाणार आहे. वासुदेवराव वानखडे यांनी सामाजिक संघटनांच्या अनेक पदावर काम केले असून त्यांनी गेली ३५ वर्षे अमरावती विद्यापीठाच्या सहाय्यक कुलसचिव पदावर सुद्धा आपली कामगिरी बजावली आहे. वासुदेवराव वानखडे यांच्या सामाजिक कार्याची नोंद घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला. त्यांना जाहीर झालेल्या पुरस्काराबाबत वानखडे यांच्या हितचिंतकांनी त्यांना शुभेच्छा द्यायला मोठी गर्दी केली आहे.