हुतात्मा दिनानिमित्त राजभवन येथे हुतात्म्यांना आदरांजली

हुतात्मा दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यावेळी राज्यपालांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. देशाच्या स्वातंत्र्यांसाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 30 जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो.

यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष सचिव राकेश नैथानी, उपसचिव श्वेता सिंघल आणि प्राची जांभेकर, राजभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांनीही दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना अभिवादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *