मोठी बातमी.. राज्यात कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले..

मुंबई : गुढीपाडव्यानिमित्त राज्य सरकारने राज्यातील नागरिकांना मोठी भेट दिली आहे. गेल्या दोन वर्षांपासून राज्यात कोरोना प्रतिबंधासाठी लावण्यात आलेले सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये मास्क वापरणे ऐच्छिक करण्यात आले आहे.

आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाचे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले.गुढी पाडव्याच्या मिरवणूक जोरात काढा. रमजान उत्सहात साजरा करा. बाबासाहेबांच्या मिरवणूका जोरात काढा, असे आव्हाड यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *