अमरावती जिल्ह्यात तिवसा तालुक्यातील मार्डा, मूर्तिजापूर, कौंडण्यपूर शिवारात २९ एप्रिल रोजी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस झाला. या पावसामुळे तालुक्यातील कांदा पिकाला फटका बसला. ऐन काढणीला आलेल्या कांदा पिकाचे काल झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
मागील काढलेले कर्ज फेडण्यासाठी परत कर्ज काढून कांदा पिकाची लागवड केली होती. मात्र हाता तोंडाशी आलेला घास या पावसामुळे व गारपिट झाल्यामुळे शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. शासनाकडून या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई करण्याची मागणी शेतकरी करीत आहे.