हदगाव तालुक्यातील मौजे चिंचगव्हाण येथील गावातील नागरिकांना महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे तीन ते चार महिन्यापासून लाईटचा प्रश्न मिटत नव्हता. महावितरण कंपनी व महावितरण अधिकाऱ्यांना वारंवार लेखी निवेदन देऊन सुद्धा चिंचगव्हाण गावाकडे लाईटच्या प्रश्नावर महावितरणने दुर्लक्ष केले होते. अखेर गावातील नागरिकांनी प्रत्येक घराला दोनशे रुपये पट्टी लावून दहा हजार रुपये निधी गोळा करून गावातील शेजारी असलेल्या विद्युत रोहित्राचे काम करून घेतले. मात्र, प्रशासनाने त्यांना कोणतीही मदत केली नाही. नांदेड जिल्ह्यात विद्युत दुरुस्ती हदगाव तालुक्याची ज्या कंपनीला दिला आहे, ती कंपनी नुसती नावाला आहे की काय? असे गावातील नागरिकांमधून बोलले जात आहे.
Written by Nagesh Wadekar
Other posts by author
- सुदृढ आरोग्यासाठी क्रीडा-कौशल्यपूरक जीवनशैलीचा अंगीकार करा – आ. सौ. सुलभाताई खोडके
- विद्युत पुरवठ्या संदर्भातील देखभाल व दुरुस्तीची कामे मान्सूनपूर्व तातडीने पूर्ण करा – आमदार सुलभाताई खोडके
- यवतमाळ : निवडणुकीचे काउंटडाऊन सुरू, भाऊ की ताई तर कार्यकर्त्याची लगीन घाई
- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा केंद्रबिंदू मानव आणि मानवच होता – आमदार सौ.सुलभाताई खोडके
- सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे आरोग्य सुविधेसाठी १३० कोटींचा निधी मंजूर